ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाणे जिल्ह्यात गुरूवारी (८ सप्टेंबर) रात्री मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसाने घरे आणि एक ४ वर्षाचा मुलगा वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे.
कळवा भास्कर नगर, शरदा माँ चाळ येथे दोन घरे वाहून गेली आहे. घरातील वस्तू वाहून गेल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. याच परिसरातील आणखी एक घर वाहून गेले यामध्ये अंकित मोर्या हा ४ वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून गेल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.