जव्हार : भ्रष्ट ग्रामसेवकांमुळे आदिवासी भागात विकासाला खीळ बसत आहे. आदिवासी ग्रामीण भाग दुर्गम क्षेत्रात जिथे सरकारी योजनांचा अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही. भ्रष्ट ग्रामसेवक या क्षेत्रात काही वेळा मुख्य अडचणी ठरतात, भ्रष्ट ग्रामसेवकांमुळे आदिवासी भागाला होणारे नुकसान झाल्याच्या अनेक वेळा ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.
ग्रामसेवकाच्या मर्जीनुसार गावात विकास कामे, खरेदी, व्यवहार होत असल्याने भ्रष्ट ग्रामसेवकच ठरताहेत आदिवासींच्या विकासाला खीळ घालत आहेत.
जव्हार तालुक्यात 48 ग्रामपंचायती असून, 2 ग्रामदान मंडळे असा एकूण 50 ग्रामपंचायती आहेत. मात्र ग्रामपंचायतींना मिळणार्या विकास निधीचा दुरुपयोग करून, काही भ्रष्ट ग्रामसेवक या निधीचा गैरवापर करीत निधीतील योजनांतील गोरगरीबांचा फायदा घेत, भ्रष्ट ग्रामसेवकच अधिक निधी लाटत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पेसा निधी, ग्रामविकास निधी, शौचलय निधी, रस्ते, शाळा, आरोग्य केंद्रे इतर विकासकामे न करताच थातुर मतुर कामे दाखवून अधिक निधीचा दुरपायोग हे ग्रामसेवकच करीत आहेत. भ्रष्टाचारामुळे योजना व समृद्धीचा फायदा केवळ काही लोकांपर्यंतच पोहोचतो, ज्यामुळे समाजात असमानता वाढते. काही लोक फसवणूक करून योजनांचा फायदा घेऊन, बाकीच्या लोकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित करीत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत.
ग्रामपंचायतीतील विविध योजना ग्रामसेवकांनी लुटल्या असे वाक्य, ग्रामसेवकांच्या भ्रष्टाचाराचे आणि सार्वजनिक योजनांच्या दुरुपयोगाचे संकेत देते. ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणारे अधिकारी असतात, जसे की केंद्र आणि राज्य सरकारांच्या योजनांचा लाभ ग्रामस्थांना मिळवून देणे. यामध्ये शेतकर्यांसाठी, आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, रस्ते बांधकाम आणि इतर सामाजिक कल्याण योजनांचा समावेश असतो. तसेच शासनाचा करोडोंचा निधी दरवर्षी येतो मात्र आदिवासी भागाचा विकास दिसत नाही. निधी जातो कुठे? हे अधिक निधी हे भ्रष्ट ग्रामसेवकच लाटत असल्याच्या तक्रारी आहे. याकडे वरिष्ठ अधिका-यानी वेळीच लक्ष घालण्याची गरज आहे.