मुंबई : ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोडक सागर तलावही आज (दि,२५) सकाळी १०.४० वाजता पूर्ण भरुन वाहू लागला. त्यामुळे आतापर्यंत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावा पैकी चार तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. मोडक सागर तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता ही १२,८९२.५ कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर) इतकी आहे. या तलावातून मुंबईला दररोज सरासरी ४५५ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो.