pudhari
ठाणे महापालिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलेच धारेवर धरल्यानंतर खड्डे बुजिवण्यात येत आहेत. pudhari news network
ठाणे

Thane | 'रस्ते कोणाचेही असो खड्डे बुजवा' - मुख्यमंत्र्यांकडून दखल

अंजली राऊत

ठाणे : घोडबंदरवरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी झटकणार्‍या ठाणे महापालिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलेच धारेवर धरले. रस्ते कोणत्याही प्राधिकरणाचे असले तरी ठाणे महापालिकेने खड्डे बुजवावे असे निर्दश स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच दिले होते.

पालिका आयुक्त सौरभ राव यांनी देखील तशाप्रकारच्या सूचना दिल्या असताना ठाणे महापालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी खड्डे बुजवण्याची जबाबदारी झटकल्याचे वृत्त साेमवार (दि.१५) रोजी 'घोडबंदर मार्गावरील खड्डे बुजवायचे कोणी?' या मथळ्याखाली दै. पुढारीने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालिका आयुक्तांना दूरध्वनी करून खड्डे तात्काळ बुजवण्याचे आदेश दिले असून आयुक्तांनीही संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरले असल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे.

रस्त्यांवरील पडलेले खड्डे बुजवण्यासाठी ठाणे महापालिका, सार्वजनिक बांधकाम, आणि एमएसआरडीसी या तीनही यंत्रणाही एक टीम म्हणून काम करावे असे निर्देश ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले असतानाही त्यांच्या निर्देशाला पालिका प्रशासनाकडून बगल देण्यात येत आहे. घोडबंदर मार्गावरील उड्डाणपूल आणि सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असताना हे खड्डे बुजवण्याची जबाबदारी आमची नसून संबधित प्राधिकरणाने खड्डे बुजवावे अशी भूमिका घेत ठाणे महापालिकेने जबाबदारी झटकल्याचे वृत्त दै पुढारीने प्रसिद्ध केले होते. तर एमएसआरडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजवले जात नसल्याने घोडबंदरला वाली कोण? असा प्रश्नही या बातमीच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला होता.

साेमवार (दि.१५) रोजी दैनिक पुढारी ने प्रसिद्ध केलेले वृत्त

यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध होताच संवेदनशील असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांना दूरध्वनी करून 'रस्ते कोणाचेही असो खड्डे बुजवा' अशा सूचना केल्या आहेत.

SCROLL FOR NEXT