सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा :
मागील आठ दिवसांत टोमॅटो, गवारी, सोयाबीनचा भाव वाढला आहे. भेंडी, ढोबळी मिरची स्वस्त होत असल्याने या भाज्यांची सध्या किचनमध्ये चलती आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या प्रतीचे टोमॅटो 52 रुपये किलो ठोक दराने विकले जात आहेत. किरकोळ भाजीपाल्यांची बाजारात 60 ते 70 रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे. बाजार समितीत गवारी 50 रुपये प्रती किलोप्रमाणे विकी होत आहे, तर भाजीपाला बाजारात 70 रुपये किलो दराने विक्री होत आहे.
सोयाबीनच्या दरातही वाढ कायम असून प्रती क्विंटल 6 हजार 300 रुपयांप्रमाणे विक्री होत आहे. यापुढील काळात दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 370 रुपये दहा किलोप्रमाणे वांगी विक्री होत आहेत. किरकोळ बाजारात याचा दर प्रती किलो 50 रुपयांवर गेला आहे. ढोबळी मिरची 30 रुपये किलोप्रमाणे बाजार समितीत विकली जात आहे. किरकोळ बाजारात 40 रुपये किलो दराने विकली जात आहे. बाजार समितीत भेंडी 25 रुपये किलोप्रमाणे विकली जात आहे. किरकोळ बाजारात 30 रुपये किलोप्रमाणे विक्री होत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमुळे पालेभाज्यांच्या दरातही तेजी आहे. बाजार समितीत 12 रुपयांना विकला जाणारी शेपू किरकोळ बाजारात 20 रुपये पेंढी विकली जात आहे.
कोंथिबीरचा दरही शेपूच्या दराइतकाच दिसून येत आहे. बाजार समितीत 42 रुपये किलोप्रमाणे लसूण शेतकर्यांकडून ठोक दराने खरेदी करण्यात येत आहे. भाजी मंडईत 60 रुपये दराने याची विक्री होत आहे. पावसाळ्यामध्ये दरात चढ-उतार होण्याची शक्यता असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. दरम्यान दरवाढीमुळे गोरगरीब, सामान्य त्रस्त झाले आहेत. महागाई वाढतच चालल्याने ते हवालदिल आहेत.