Solapur Schools News | शाळेची वेळ बदल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान File Photo
सोलापूर

Solapur Schools News | शाळेची वेळ बदल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान

मुख्याध्यापकाचा मनमानी कारभार; शिक्षक भारतीकडून चौकशीची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : करमाळा तालुक्यातील वांगी नंबर दोन येथील अवधूत विद्यालय खासगी अनुदानित माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकाने शिक्षण विभागाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता शाळेच्या वेळेत बदल केल्याचा दावा शिक्षक भारती संघटनेने केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

शासन निर्णयानुसार, माध्यमिक शाळांचे नियमित वेळापत्रक सकाळी साडेदहा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत आहे. मात्र, संबंधित मुख्याध्यापकाने शुक्रवारी दि. 4 जुलैला शाळा सकाळी साडेसात वाजता सुरू करून दहा वाजता शाळा बंद केली. यामुळे कोणतेही अध्यापन न होता विद्यार्थ्यांचा संपूर्ण दिवस वाया गेला आहे. याविषयी शिक्षक भारती संघटनेंनी संबंधित मुख्याध्यापकाविरोधात माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे ई-मेलद्वारे लेखी तक्रार दाखल केली आहे.

सीसीटीव्ही तपासणी करा

मुख्याध्यापक उन्हाळी सुट्टीदरम्यान शाळेसाठी बंधनकारक असलेले काम टाळून वारंवार गैरहजर राहत आहेत. इतकेच नव्हे, तर हजेरीपत्रकात बोगस सह्या केल्या जात असल्याचा संशय शिक्षक भारती संघटनेंनी व्यक्त केला आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून सखोल चौकशी करावी आणि दोषींवर शिस्तभंगात्मक कारवाई करावी, अशी मागणी संघटनेकडून होत आहे.

शुक्रवारी दि. 4 सकाळच्या सत्रात शाळा भरविली होती. ती शाळा पूर्णवेळ म्हणजेच साडेबारापर्यंत चालू ठेवली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले नाही. शिक्षक भारती संघटनेंनी केलेली तक्रार तथ्यहिन असून, मला बदनाम करण्याचा त्यांचा डाव आहे. शाळेच्या वेळाविषयी माध्यमिक शिक्षण विभागाने चौकशी करावे.
- राजेंद्र वणवे, मुख्याध्यापक, वांगी नंबर दोन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT