सोलापूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इयत्ता आठवीत शिक्षण घेणार्या गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या योजनेतून वर्षाला 12 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यासाठी राज्य परीक्षा परिषद ही यंदा 21 डिसेंबरला राज्यात परीक्षा घेणार आहे. इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यासाठीच ही योजना सुरू केली आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी 11 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
राष्ट्रीय शिष्यवृत्ती (एनएमएमएस) पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता सातवीच्या परीक्षेत 55 टक्के गुणाची अट असून पालकांचेे वार्षिक उत्पन्न हे तीन लाख 35 हजार रुपयांहून अधिक नसावे. हे आर्थिक व गुणात्मक निकष आहेत. यासाठी तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला जोडावा लागेल.
हे राज्य परीक्षा परिषदेकडून घोषित केलेल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर येत्या 21 डिसेंबरला घेतली जाणार आहे. या परीक्षेचा निकाल नवीन वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील दुसर्या आठवड्यापर्यंत जाहीर होतो. विद्यार्थ्यांना मानसिक क्षमता व शैक्षणिक अभियोग्यता चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अनुदानितसह विनाअनुदानित, केंद्रीय विद्यालयातील आणि जवाहर नवोदय विद्यालयासह वसतिगृहातील सवलतीचा लाभ घेणारे व तसेच सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी परीक्षा देता येते.