सोलापूर : पंतप्रधान किसान सन्मान निधी ‘पीएम किसान’ योजनेच्या लाभासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी पुढील हप्ता अखंडित सुरू ठेवण्यासाठी ३० जूनपूर्वी आपली वार्षिक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. अन्यथा वार्षिकरित्या मिळणाऱ्या ६ हजार रुपयांच्या मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.
केंद्र शासनाने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत व पारदर्शक ठेवण्यासाठी वार्षिक ई-केवायसी सक्तीची केली आहे. मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांचा पुढील हप्ता रोखला जाऊ शकतो. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसल्याने कृषी विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे.
खरीप हंगामानिमित्ताने कृषी विभागाकडून गावोगाची मेळावे, घेण्यात येत आहेत. त्यात जनजागृती सुरू आहे. पीएम किसानचा लाभ अखंडित ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया न केल्यास लाभार्थ्याच्या खात्यात पुढील हप्ते जमा होणार नाहीत.