वेळापूर : पुढारी वृत्तसेवा
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील तालुक्यातील माळशिरस तिसरे व शेवटचे गोल रिंगण ठाकुरबुवा मंदिरा समोर आज दि१४ जुलै रोजी सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी भक्तीमय वातावरणात पार पडले. दोन्ही अश्वांनी तीन फेऱ्या पूर्ण करून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
रिंगण सोहळ्यानंतर उडीचा, फुगड्या, पावल्या, काटवट, हुतूतू आदी पारंपरिक खेळ पुरुष, महिला वारकऱ्यांनी सादर केले. यावेळी माऊली... माऊलीच्या जयघोषाने परिसर दुमदुमुन गेला. त्यानंतर पालखी रथामध्ये ठेवून हा सोहळा टप्पा येथील माऊली सोपानदेव बंधू भेटीसाठी भंडीशेगाव मुक्कामी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला.