कोपर्डे हवेली; पुढारी वृत्तसेवा : ओगलेवाडीत (ता. कराड) येथील आत्माराम विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच झाला. 1974/75 च्या बॅचने या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. 46 वर्षानंतर वर्गमित्र मैत्रिणींच्या भेटीमुळे जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला.
यावेळी माजी जेष्ठ शिक्षक आर. जी. कुलकर्णी, श्रीकृष्ण घळसासी, एम. ए. कुलकर्णी, फुके, भिमराव डुबल, प्रा. ताम्हणकर, सुमती कुलकर्णी, आशालता पाठक, सहमुख्याध्यापक प्रतिभा तारु, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष विनायकराव जाधव, रघुनाथ डुबल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शिक्षक, लेखनिक, शिपाई यांचा सत्कार करण्यात आला. सयाजी डुबल, सुभाष कदम, सूर्यकांत पवार यांनी स्वागत केले. शशिकांत माने यांनी प्रास्ताविक केले. आत्माराम विद्यामंदिराने शिक्षणाबरोबरच आमच्यावर संस्कार करून जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा दिली. त्यामुळे आम्ही जीवनात यशस्वी ठरलो, असे विचार माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
यावेळी किशोर पाटील, पुरंदर माळी, शेखर सावगावे, सुर्यकांत कदम, भरत शहा, नवीन शहा, जयंत पुरोहित, हुसेन इनामदार, अशोक पाडळे, सुभाष माने, निवास कोळेकर, मंगल धोकटे, संपतराव पाटील, भावना छेडा, नसीम आवटे, बाळकृष्ण डुबल, सुभाष आठवले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांना शाळेतील बाकाची प्रतिकृती भेट देण्यात आली. शशिकांत माने यांनी आभार व तेजस्विनी शहा यांनी सूत्रसंचालन केले.