सातारा : सातारा जिल्ह्यात मे महिन्यापासून पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील सर्व धरणातील पाणी साठा 60.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे जुलै महिन्यापर्यंत सर्व धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत झाली आहे.
सातारा जिल्ह्यात मे महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मे महिन्यातच दुष्काळी तालुक्यातील सुरू असलेले पाण्याचे टँकर बंद झाले होते. तसेच जिल्ह्याच्या पश्चिम भागातील डोंगर रांगात धबधबे प्रवाहीत झाले होते. सध्या जिल्ह्यात सर्वत्रच पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
कोयना धरणात आजची पाणीपातळी 646.28 मीटर असून उपयुक्त पाणी साठा 56.410 टीएमसी असून आजची 56.34 टक्के पाणी पातळी असून धरणात 32 हजार 437 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. 1 हजार 50 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर धरणात गतवर्षीपेक्षा 37.17 टक्के पाणी जास्त आहे. धोम धरणात आजची पाणीपातळी 741.43 मीटर असून उपयुक्त पाणी साठा 7.100 टीएमसी असून आजची 60.74 टक्के पाणी पातळी आहे. धरणात 2 हजार 308 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. तर धरणात गतवर्षीपेक्षा 36.83 टक्के पाणी जास्त आहे. धोम बलकवडी धरणात आजची पाणीपातळी 794.53 मीटर आहे. उपयुक्त पाणी साठा 1.540 टीएमसी असून आजची 38.89 टक्के पाणी पातळी आहे. धरणात 1 हजार 440 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. तर धरणात गतवर्षीपेक्षा 34.09 टक्के पाणी जास्त आहे.
कण्हेर धरणात आजची पाणीपातळी 686.05 मीटर असून उपयुक्त पाणी साठा 6.780 टीएमसी आहे. आजची 70.70 टक्के पाणी पातळी आहे. धरणात 3 हजार 866 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. 2 हजार 997 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर धरणात गतवर्षीपेक्षा 48.07 टक्के पाणी जास्त आहे. उरमोडी धरणात आजची पाणीपातळी 690.83 मीटर असून उपयुक्त पाणी साठा 6.920 टीएमसी आहे. आजची 71.71 टक्के पाणी पातळी आहे. धरणात 2 हजार 642 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. 2 हजार 191 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर धरणात गतवर्षीपेक्षा 59.38 टक्के पाणी जास्त आहे. तारळी धरणात आजची पाणीपातळी 704.80 मीटर असून उपयुक्त पाणी साठा 4.620 टीएमसी आहे. आजची 79.11 टक्के पाणी पातळी असून धरणात 1 हजार 850 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. तर धरणात गतवर्षीपेक्षा 56.68. टक्के पाणी जास्त आहे.