कराड : महाराष्ट्राची वरदायिनी मानल्या जाणाऱ्या कोयना धरणातून शुक्रवारी (दि.२६) सकाळी 7 वाजता विसर्ग वाढविण्यात आला आहे. प्रतिसेंकद 30 हजार क्युसेक पाणी कोयना नदीत सोडण्यास सुरुवात करण्यात आले आहे. सकाळी ८ वा. धरणामध्ये एकूण ८१.१९ टीएमसी ७७.१४ % पाणीसाठा झाला आहे.
सद्यस्थितीत सांडव्यावरून ३०००० क्यूसेक्स विसर्ग चालू आहे. पाणलोट क्षेत्रामधील मुसळधार पावसामुळे सातत्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज दुपारी १२ वा. सांडव्यावरून सोडणेत आलेल्या विसर्गात वाढ करून ४०,००० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात येणार आहे. धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ४२१०० क्युसेक्स असेल. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.