सांगली

सांगली : जिल्ह्यात 3 ते 15 ऑगस्ट ‘हर घर तिरंगा’ उपक्रम

backup backup

सांगली; पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 'हर घर तिरंगा' उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वराज्य महोत्सव राबविण्यात येणार आहे. यामध्ये जनतेने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे-चौगुले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील उपस्थित होते.

ते म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त दि. 12 मार्च 2021 ते दि. 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत 'आजादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने दि. 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत देशभरात 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविणार आहे. राज्य शासनामार्फत 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम, कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

ते म्हणाले, राष्ट्रध्वज हा हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सुत / पॉलिस्टर/ लोकर/ सिल्क/खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत. राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता घ्यावी. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कमीत कमी पाच राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दान स्वरूपात सुपूर्द करावेत. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या उपक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावा.

हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात यावे. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये विशेष सभांचे आयोजन करणे, जिल्ह्याच्या ठिकाणी तिरंगा बलून सोडणे, जिल्ह्यातील स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्मे यांचे दुर्मिळ फोटो व त्यांच्या कार्याची माहिती गावातील रस्त्याच्या कडेला लावण्याबाबत नियोजन करावे. विविध स्पर्धांचे यामध्ये प्रामुख्याने निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करण्यात येईल. जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळाच्या ठिकाणी पदयात्रांचे आयोजन, सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

कोरोनाचा बूस्टर डोस घ्यावा

ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुसरा डोस, प्रिकॉशन डोस (बूस्टर डोस) मधील अंतर कमी करून सहा महिने किंवा 26 आठवड्याचा कालावधी करण्यात आला आहे. 18 वर्षावरील सर्व नागरिकांना जिल्ह्यात 30 सप्टेंबरपर्यंत हा बूस्टर डोस मोफत देण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा. ऑगस्टमध्ये गणेश उत्सव सुरू होत असून गावांगावांमध्ये उत्सव काळात कोविड लसीकरण शिबिरांचे आयोजन गणेश मंडळांच्या सहकार्याने करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT