वारणावती : पुढारी वृत्तसेवा
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटन शुल्कात जवळपास तिपटीने वाढ झाली आहे. माणसी तीस रुपये आकारला जाणारा पर्यटन दर आता प्रति पर्यटक शंभर रुपये करण्यात आला आहे. त्याचबरोबर 12 वर्षांखालील पर्यटक, गाईड शुल्क, वाहन कर, कॅमेरा शुल्क यातही भरमसाट वाढ करण्यात आली आहे.
सह्याद्री व्याघ्र राखीव नियामक मंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव कोल्हापूर यांच्या कार्यालयाकडून बैठकीचे इतिवृत्त पाठवण्यात आले आहे. यात पर्यटन शुल्काच्या वाढीव दरास नियामक मंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार हे दर वाढवण्यात आले आहेत. दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. दूरवरून पर्यटक येत असतात. सुट्टीच्या दिवशी मोठ्याप्रमाणात गर्दी असते. लोक व मुले या ठिकाणी आनंद घेत असतात. तिपट्टीने दरवाढ करण्यात आली आहे.
पर्यटकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी केले
आहे.