Sugar Export Ban 
सांगली

Sugar Export Ban : साखर निर्यातीवर बंदी; कारखानदार, संघटना संतप्त

जिल्ह्यातील ऊस उत्पादक, कारखानदारांना बसणार फ टका ः मान्यवरांकडून प्रतिक्रिया

पुढारी वृत्तसेवा

सांगली ः केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हा बंदी आदेश दि. 13 मे पासून दि. 30 सप्टेंबरपर्यंत लागू असल्याची अधिसूचना जारी केली आहे. देशांतर्गत पुरवठा आणि किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र या निर्णयामुळे शेतकरी आणि कारखानदारांना फ टका बसणार आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

कारखानदारी मोडीत काढण्याचा निर्णय ः मानसिंगराव नाईक

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक म्हणाले, साखर कारखानदारी मोडीत काढण्याचा हा निर्णय आहे. या निर्णयामुळे कारखानदारी अणि शेतकरीसुद्धा अडचणीत येणार आहेत. साखरेचे दर कमी होणार आहेत. उलट साखर निर्यातीमुळे देशाला परकीय चलन उपलब्ध झाले असते. परिणामी शेतकऱ्यांनाही चांगले पैसे मिळाले असते.

कारखानदारी अडचणीत येणार ः प्रतीक पाटील

राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील म्हणाले, निर्यातबंदी ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. या निर्णयामुळे साखरेचे दर पडतील. परिणामी शेतकऱ्यांच्या उसाला जादा भाव मिळणार नाही. एकीकडे एफआरपीमध्ये वाढ करून सरकार, आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दिखावा करीत आहे, तर दुसरीकडे निर्यातबंदी घालून साखरेचे भाव पाडण्याचे षड्‌‍यंत्र रचले जात आहे. हा निर्णय साखर कारखानदारीला अडचणीत आणणारा आहे.

शेतकरीविरोधी निर्णय ः धनाजी चुडमुंगे

आंदोलन अंकुशचे नेते धनाजी चुडमुंगे म्हणाले, मुक्त अर्थव्यवस्थेचे गोडवे गाणारे सरकार शेतकऱ्यांच्या मालावर कायम निर्बंध का घालते, हेच समजत नाही. इथेनॉलकडे साखर जास्त वळवली जात असल्यामुळे भविष्यात साखर दर तेजीत येऊन आपल्या उद्योगपती मित्रांना नुकसान होऊ नये, म्हणून निर्यातबंदी घातली आहे. हे सरकार शेतकरीविरोधी आहे, त्यांच्या प्रत्येक धोरणातून ते समोर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT