सांगली : कोल्हापूर रस्त्याकडेला अनेक शेतांमध्ये पाणी साचून तळे निर्माण झाले आहे.  Pudhari Photo
सांगली

Sangli Rain: 291 गावांतील 96 हजार शेतकर्‍यांना फटका

अतिवृष्टीचा परिणाम : 51 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

सांगली : अतिवृष्टी आणि नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे 51 हजार 386 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, 96 हजार 186 शेतकर्‍यांना फटका बसला आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरु केले आहेत.

महिन्याभरात अतिवृष्टी आणि नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने 291 गावांना पावसाचा फटका बसला. यामुळे 96 हजार 186 शेतकर्‍यांच्या 51 हजार 386 हेक्टर क्षेत्रातील पिकांची हानी झाली. शासनाकडून पंचनामे करुन नुकसानीचा अहवाल देण्याचे आदेश कृषी विभागाला आले आहेत. त्यानुसार पंचनामे सुरु असून, काही ठिकाणी पाणी ओसरल्यानंतर पंचनामे करावे लागणार आहेत. त्यानंतर नुकसानीचा अहवाल शासनाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी अधीक्षक विवेक कुंभार यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT