सांगली

अन्यथा सेल्फी पॉईंट उखडून टाकू : शिवसेनेचा इशारा

अविनाश सुतार

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर असे नामकरण व्हावे, अशी शहरवासीयांची इच्छा असताना शहरात उभा करण्यात आलेला 'आय लव्ह उरुण-इस्लामपूर' हा सेल्फी पॉईंट म्हणजे नागरिकांच्या मागणीची चेष्टा केल्याचा निंदनीय प्रकार आहे. त्यामुळे नगरपालिकेने हा सेल्फी पॉईंट काढून टाकावा, अन्यथा शिवसैनिक स्वतः तो उखडून टाकतील, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.

याबाबत मुख्याधिकारी वैभव साबळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण व्हावे, अशी आमची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. 40 हजार शहरवासियांनी आपल्या सह्यांचे तसे निवेदन नगरपालिकेला दिले आहे. या नागरिकांच्या भावनेची कदर करून शहराचे नामांकरण होणे गरजेचे होते. मात्र नगरपालिकेने जुन्याच नावाचा सेल्फी पाँईंट उभा करून शहरवासियांच्या भावनेची चेष्टा केली आहे. पालिकेने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा शिवसैनिक हा सेल्फी पॉईंट उखडून टाकतील.

तालुकाध्यक्ष सागर मलगुंडे, शहरप्रमुख शकील सय्यद, अंकुश माने, राजू पठाण, सूर्यकांत पाटील, विमल शेवाळे, योगेश हुबाले, अजित पाटील, कृष्णात पाटील, सतीश पाटील, सूरज पाटील, प्रदीप लोहार, सागर भोजुगडे, भूषण शिंदे, विलास नाईक यांनी हे निवेदन दिले
आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT