विटा : पुढारी वृत्तसेवा
खानापूर तालुक्यात पहिल्यांदाच अनुसूचित जमातीसाठी नागेवाडी गावचे सरपंचपद राखीव तर पळशी ग्रामपंचायत सलग तिसऱ्या वेळा महिला राखीव झाल्याने सर्वांनीच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, तहसीलदार योगेश टोम्पे, नायब तहसीलदार डॉ. विजय साळुंखे आणि वैभव हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आरक्षण सोडत प्रक्रिया निर्विवाद पार पडली.
खानापूर तालुक्यातील ६४ गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत आज बुधवारी पार पडली. यावेळी विविध गावचे सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी यांच्यासह प्रमुख राजकीय पक्षांचे मंडळी उपस्थित होते.
अनुसूचित जाती महिला प्रवर्ग ; गोरेवाडी, देवनागर, तांदळगाव, धोंडेवाडी, अनुसूचित जाती प्रवर्ग; जाधववाडी, धोंडगेवाडी, ताडाचीवाडी, माधळमुठी, अनुसूचित जमाती (महिला) नागेवाडी
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) - आळसंद, बामणी, ऐनवाडी, जाधवनगर, कमळापूर, घानवड, पोसेवाडी, सांगोले, वाळूज
नागरिकांचा मागास प्रवर्ग - कार्वे, करंजे, घोटी खुर्द, रामनगर, चिंचणी, वाझर, राजधानी भेंडवडे, कार्वे, बानुरगड
सर्वसाधारण महिला; - बलवडी खा, बेणापूर, भडकेवाडी, भाळवणी, भेंडवडे, भूड, चिखलहोळ, जखिनवाडी, जोंधळखिंडी, माहूली, मेंगाणवाडी, पळशी, पंचलिंगनगर रेवणगाव, वलखड, वासुंबे, मंगरूळ, ढवळेश्वर
सर्वसाधारण - कुर्ली, लेंगरे, खंबाळे, मोही, पारे, रेणावी, साळशिंगे, वेजेगाव, सुलतानगादे, गार्डी, भाग्यनगर, भांबर्डे, भिकवडी बु, हिंगणगादे, हिवरे, कळंबी, बलवडी भा., देवीखिंडी, घोटी बु, अशा पद्धतीने ६४ गावांच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडती आज पार पडल्या. अनया संदीप लाड या चिमुकलीच्या हस्ते आरक्षित गावच्या सरपंच पदाच्या चिठ्ठ्या उचलण्यात आल्या.