रायगड

पनवेल : कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू 

दिनेश चोरगे

पनवेल;  पुढारी वृत्तसेवा :  मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर कळंबोली ब्रिजवर भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून कारने अज्ञात वाहनाला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्यात कारचालक जयंत फकिराजी डांगे (46), दिंडोशी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्यांमध्ये शैलेद्र शुक्ला (34), रादिंडोशी व शशिकुमार बैजनाथ प्रसाद (45), रा. अंधेरी यांचा समावेश आहे.

गोरेगाव पूर्व, दिंडोशी येथे राहणारा जयंत डांगे हा त्याची कार घेऊन मित्र शैलेद्र शुक्ला, रा- दिंडोशी व शशिकुमार बैजनाथ प्रसाद (41), रा. अंधेरी यांच्यासह गोवा येथे फिरण्यासाठी गेले होते. ते परतत असताना
कळंबोली ब्रिजवर डांगे याचे कारवरील नियंत्रण सुटून अज्ञात वाहनाला पाठीमागून त्यांनी जोराची धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, कारच्या पुढील बाजुचा चक्काचूर झाला आहे.

कार पुर्णपणे दबलेल्या स्थितीत असल्याने शशिकुमार बैजनाथ प्रसाद याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी फायर ब्रिगेडला पाचारण केले. उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
पोलिसांनी एमजीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कारचालक डांगे याचा जबाब नोंदवून तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT