रायगड - रायगड जिल्हयात पावसाचा जोर कमी झाला आहे. जिल्हयात काही भागात पावसाच्या तुरळक सरी होत आहे. रायगड जिल्ह्यात पुढील चार दिवसासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे.
जुलै महिन्यात पावसाचा जोर सर्वाधिक असतो. मात्र जिल्हयात सध्या पावसाचा जोर कमी आहे. मंगळवारी जिल्हयातील काही तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊ झाला नाही. जिल्हयात आता खरिपाची भात लागवड सुरु झाली आहे. दक्षिण रायगडमध्ये काही ठिकाणी भात लावणी सुरु झाले. शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे.