रायगड, पुढारी वृत्तसेवा: हवामान विभागाने सोमवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. मात्र सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात मोठ्या सरी झाल्या नाहीत. उलट दुपारच्या सुमारास अनेक तालुक्यात कडकडीत उन्ह पडले होते. सोमवारी खालापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
मंगळवारी ऑरेंज, बुधवारी येलो आणि पुन्हा पुढील दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे. सोमवारी खालापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने २४ ते २७ जून दरम्यान ऑरेंज अलर्टचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हयात मुसळधार पावसाची शक्यता होती. मात्र सोमवारी काही तुरळक सरी वगळता जिल्ह्यात मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे हवामान विभागाचा सोमवारसाठीचा ऑरेंज अलर्ट फुसका ठरला आहे.
आता मंगळवारी ऑरेंज, बुधवारी येलो आणि पुन्हा पुढील दोन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात अलिबाग तालुक्यात १ मि.मी., पेण २, उरण १२, कर्जत २४.५०, - खालापूर ४५, सुधागड २३, श्रीवर्धन २८, माथेरान २५.८०, मुरुड व पोलादपूर ५ मिमी. पावसाची नोंद झाली आहे.