अलिबाग: गेल्या चार-पाच दिवसांपासून रायगड जिल्हयात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र आता रविवार सोडल्यास आगामी तीन-चार दिवसात पावसाचा जोर कमी राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात जोरदार पाऊस झाला आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने त्यानंतर मात्र पावसाने सातत्य राखले जिल्ह्यात हाहाकार उडवून दिला आहे.
जुलै महिना आणि त्यानंतर आगस्ट महिन्यातही पावसाच्या जोरदार सरी होत आहेत. येत्या रविवा-रसाठी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून त्यानंतर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे.