उरण (रायगड): करंजा जेट्टीवरील सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, पर्यटकांची विशेष करून महिलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. चाणजे ग्रुप ग्रामपंचायत व महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड विभागाच्या अधिकार्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत कोळी बांधवांची दहा ते बारा हजारांच्या आसपास लोकवस्ती आहे. कोळी बांधव आपला पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय तसेच मासेमारीसाठी जाणार्या बोटी करंजा जेट्टीवर नांगरुन ठेवण्याचे काम करत आहेत. तसेच अलिबाग ते उरण या ठिकाणाहून ये-जा करणारे प्रवासी नागरिक व पर्यटक हे करंजा बंदरातील जेट्टीचा वापरही मोठ्या प्रमाणात करत आहेत. गैरसोय लक्षात घेऊन महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड व रायगड जिल्हा परिषद, चाणजे ग्रुप ग्रामपंचायत यांनी आठ-दहा वर्षांपूर्वी याठिकाणी सार्वजनिक शौचालयाची बांधण्याचे काम हाती घेतले होते. परंतु, स्वच्छतागृह बांधल्यानंतर या ठिकाणी कुठलीही देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे या स्वच्छतागृहाची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना स्वच्छ आणि नादुरुस्त स्वच्छतागृहामध्ये नाईलाजाने जाऊन त्रास सहन करावा लागत आहे.
कोळी बांधव व प्रवासी नागरिक, पर्यटकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड व रायगड जिल्हा परिषद, चाणजे ग्रुप ग्रामपंचायत यांनी आठ-दहा वर्षांपूर्वी याठिकाणी सार्वजनिक शौचालयाची बांधण्याचे काम हाती घेतले होते. परंतु, स्वच्छतागृह बांधल्यानंतर या ठिकाणी कुठलीही देखभाल दुरुस्ती झाली नाही.