जेएनपीए : विठ्ठल ममताबादे
सरकारने राज्यातील शहरी तसेच गाव परिसरात स्मार्ट मीटर बसविण्याचा ठेका हा दहा वर्षांच्या करारा नुसार अदानी ग्रुप ला दिला आहे. त्याची सुरुवात काही शहरात, गावामध्ये झाली आहे. नुकताच विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर अदानी ग्रुप च्या माध्यमातून उरण तालुक्यातील शासकीय कार्यालयात स्मार्ट मीटर बसविण्याची सुरुवात केली जात आहे. तसेच तालुक्यातील चिरनेर गावात ही स्मार्ट मीटर बसविण्याची हालचाल सुरू असल्याचे वृत्त समोर येत आहे.
शहरा प्रमाणे गावा गावातील रहिवाशांच्या विजेवर आता अदानी ग्रुप ची नजर पडणार असल्याने जनमानसात तर्कवितर्क वर्तविण्यात येत आहेत. राज्यातील शहरी,गाव परिसरातील रहिवाशांना सरकारच्या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत होता.
त्यानंतर महावितरण कंपनीच्या माध्यमातून विद्युत पुरवठा करण्यात येत असून विद्युत धारक ग्राहकांना महावितरण कंपनीच्या माध्यमातून मीटरचे वितरण करण्यात येत होते.सध्या राज्य सरकारने विद्युत धारक ग्राहकांना बसविण्यात येत असलेल्या विद्युत पुरवठा बिलातील मीटरचा ठेवा हा अदानी ग्रुप ला दिल्याने या माध्यमातून राज्यातील काही शहरात गावामध्ये स्मार्ट मीटर बसविण्याचे काम हे काही अंशी सुरू केले जात असताना नागपूर सारख्या प्रगतशील शहरा बरोबर गावातून अदानी ग्रुप च्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या कामाला रहिवाशांनी विरोध दर्शविला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विद्युत धारक ग्राहकांना बसविण्यात येत असलेल्या स्मार्ट मीटरचे काम थांबविण्यात आले होते.मात्र, सध्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर नंतर अदानी ग्रुपच्या माध्यमातून उरण तालुक्यातील शासकीय कार्यालयात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच चिरनेर गावात ही स्मार्ट मीटर बसविण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे वृत्त समोर आले.त् यामुळे आता रहिवाशांच्या विजेवर अदानी ग्रुप ची नजर पडणार असल्याने रहिवाशांमध्ये संतापाची भावना उमटू लागल्या आहेत.