Karjat Mangaon Goat Farm Fire
कर्जंत : कर्जत तालुक्यातील कर्जत - नेरळ राज्यमार्गावर माणगाव गावच्या हद्दीत असलेल्या गोट फार्ममध्ये भीषण आग लागली. या आगीमध्ये तब्बल ४०० बकऱ्यांचा आणि ३६० कबुतरांचा होरपळून मृत्यू झाला. त्यात या ठिकाणी लागलेली आग ही रात्रीच्या वेळी लागल्याने मदतकार्य मिळण्यात अडचणी आल्याने मोठ्या प्रमाणात बकऱ्यांचा बळी यात गेला आहे.
आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की बकऱ्यांना बाहेर काढण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. परिणामी मोठ्या संख्येने मुक्या प्राण्यांचा दुर्दैवी अंत झाला. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे