रायगड

रायगड : २२ वर्षानंतर महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात

backup backup

रायगड, पुढारी वृत्तसेवा : २२ वर्षानंतर महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. सध्याच्या गतिमान व संगणकीय युगामध्ये मैदानी खेळ अत्यंत महत्त्वाचे असून ते दैनंदिन स्वरूपात खेळल्याने आयुष्यमान वाढण्यास मदत होते, असे मत महाड येथील हृदयरोग तज्ञ पद्मश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी व्यक्त केले. दुर्ग रायगड येथे बुधवारी (दि.०४) झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक स्पर्धेच्या मुख्य ज्योत प्रज्वलन प्रसंगीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी अजित गायकवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांसह सुप्रसिद्ध वेटलिफ्टर प्रतीक्षा गायकवाड तसेच स्थानिक पदाधिकारी शासकीय अधिकारी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व शिवशक्ती पुरस्कार विजेते उपस्थित होते.

राज्य ऑलिम्पिक स्पर्धेला शुभेच्छा देताना पद्मश्री डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांनी सार्वजनिक जीवनात खेळाचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये व संगणकीय क्षेत्रात असलेली तरुण पिढी लक्षात घेता मैदानी खेळांचे महत्त्व ओळखून आयुष्यात दैनंदिन स्वरूपात खेळ खेळल्यास आयुष्यमान वाढण्यास मदत होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. भावी पिढीने दैनंदिन स्वरूपाचे कोणत्याही प्रकारचे खेळ नियमित रित्या खेळावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.

किल्ले रायगडावरून वरून ही ज्योत प्रज्वलित करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळापासून पुणे येथे होणाऱ्या राज्य ऑलिम्पिक स्पर्धेच्या ठिकाणी नेण्यात आल्याची माहिती या कार्यक्रमाच्या संयोजकांकडून देण्यात आली. किल्ले रायगडावरून पाचाड येथे उतरल्यानंतर महाडनगर परिषदेकडून या ज्योतीचे स्वागत करण्यात आले. तसेच माणगावमध्ये स्थानिक प्रशासन व विविध क्रीडा संस्थांचे पदाधिकाऱ्यांमार्फत शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये स्वागत करण्यात आले.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT