संतोष उतेकर
सुधागड: अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात पाणी पुरवठ्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे शहरातील धुंदीविनायक नगर भागात नळांना चक्क जंतुयुक्त काळे कुठे आणि दुर्गंधीयुक्त पाणी असल्याने नागरिकांमध्ये भीती व संतापांचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो भाविक आणि स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या अंबा नदीचे पात्र रसायनयुक्त सांडपाणी कचरा आणि वाळू उपशामुळे प्रदूषित झाले आहे.
27 कोटींची योजना लाल भीतीत
पालीची लोकसंख्या आणि येथे येणारे हजारो भावी लक्षात घेता 27 कोटी रुपयांची शुद्ध पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे मात्र ही योजना अद्यापही तांत्रिक कारणास्तव लाल भीतीत अडकली आहे परिणामी शुद्ध करणविना थेट अंबा नदीचे पाणी नळाद्वारे पुरवले जात असल्याने नळांतून अनेकदा जिवंत साप किडे आणि चिखल बाहेर येण्याची प्रकार घडले आहेत
नदीला प्रदूषणाचा विळखा
नदीपात्रात कंपनीचे रसायुक्त पाणी आणि शहराचे सांडपाणी थेट सोडले जात आहे तसेच निर्माण कचऱ्यामुळे पाणी कुजून ज्याला दुर्गंधी येते आणि याचं दूषित परिणामाचा पुरवठा शहरात होत असल्याने जलजन्य आजारांची टांगती तलवार नागरिकांवर आहे
कोट धुंदी विनायक नगर भागात नळाला अत्यंत दूषित पाणी आले आहे अशुद्ध पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे प्रशासनाने केवळ आश्वासने न देता तात्काळ शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा- राहुल महाजन, स्थानिक नागरिक