महाड : महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणात थेट मुख्यंमत्रांवर टीपण्णी केली आहे. ’राज्याचे मुख्यमंत्री इतके असहाय्य आहेत का की ते आपल्याच युतीमधील पक्षांच्या कार्यकर्त्यांना आवरू शकत नाहीत’ असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोदवले आहे
हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने सरकार आणि प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. राड्याप्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास आणि पुतण्या महेश यांच्यासह माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीयांश जगताप यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पण अद्याप त्यांना अटक करण्यात पोलिसांना अपयश आले याची दखल न्यायालयाने घेतली आहे. मात्र अद्याप मंत्र्यांच्या मुलासह इतरांना अटक न झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाची नाराजीच व्यक्त केली आहे.
पुढे न्यायालयाने मुख्यमंत्री तसेच मंत्री भरत गोगावले यांच्याकडून निर्देश घेण्याच्या राज्य सरकारला सूचना केल्या आहेत. तसेच आपला मुलगा फरार बसून आपल्या संपर्कात असल्याचं भरत गोगवलेंच वक्तव्य देखील मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आले. त्यामुळे सरकार कोणालाही २४ तासात अटक करू शकते जेव्हा त्यांना अटक करायची नसते तेव्हा ते प्रतिज्ञापत्र सादर करतात. त्यामुळे या प्रकरणात महाराष्ट्रातील कायद्याचे राज्य प्रतिकूलरित्या प्रभावित झाल्याच उच्च न्यायालयाचा निरीक्षण नोंदवले आहे तसेच आज पाच वाजेपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश ही देण्यात आले आहे. सत्तेत असलेल्या पक्षांचे कार्यकर्ते जर उघडपणे शस्त्रांचा वापर करत असतील आणि कायदा हातात घेत असतील, तर पोलीस प्रशासन काय करत होते, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला
दरम्ययान सरकारी वकिलांच्या विनंतीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र उद्या सुनावणी सुरू होण्यापूर्वी गुन्हा दाखल झालेल्यांन आत्मसमर्पण करण्यास सरकारने सांगावे असे न्यायालयाने आदेश दिले आहेत. उद्या सकाळी ११ वाजता पुन्हा या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
दरम्यान नगरपरिषद निवडणुक मतदान प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात झालेल्या राड्यानंतर दोन्हीकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये याआधीच काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आतापर्यंत पोलिसांनी दोनही गटातील सहाजणांना ताब्यात घेतले आहे. डिसेंबर 2025 मध्ये हा राडा झाला होता
मंत्री गोगावले यांचा मुलगा करणार आत्म सपमर्पण
दरम्यान मंत्री भरत गोगावले यांच्याशी संपर्क करण्यात आला असून गोगावले यांनी मुलाशी संपर्क साधण्याच आश्वासन दिल असून त्यानंतर तो आत्मसमर्पण करेल अशी माहिती सरकारी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. त्यामुळे उद्या सुणावर्णीपूर्वी गोगावले यांचा मुलगा आत्मसर्मपण करण्याची शक्यता आहे.