दिवे : पुढारी वृत्तसेवा
दिवे परिसरात फळबागांची लागवड जास्त प्रमाणात असल्याने तसेच दिवसेंदिवस वाढत असणार्या रासायनिक खतांच्या किमतीमुळे शेणखत, कोंबडीखत तसेच मळी वापरण्याकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. परंतु, या खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. याला डिझेल दरवाढीचे कारण पुढे केले जात आहे.
मागील वर्षी 12 हजारांना मिळणारा खतांचा डंपर सध्या तब्बल 14 ते 15 हजारांच्या घरात गेला आहे, तर 100 ते 110 रुपयांना मिळणारी कोंबडीखताची पिशवी आता 150 रुपयांना मिळत आहे. एकीकडे रासायनिक खतांच्या किमती वाढत असल्याने शेणखत, कोंबडीखताचा वापर वाढला होता.
मात्र, या खतांच्या किमतीदेखील वाढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उत्पादन खर्च जास्त आणि पीक जोमदार आले, तरी बाजारभावाची हमी नाही. त्यामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे.
हेही वाचा