पुणे

पुनावळे पुलावरील विजेच्या खांबाची दुरवस्था

अमृता चौगुले

ताथवडे : पुढारी वृत्तसेवा : पुणे-मुंबई महामार्गावरील पुनावळे पुलावरील विजेच्या खांबाची दुरवस्था झाली आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला वादळी वार्‍यासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. तर, काही ठिकाणी पाणी साचले होते. तसेच, बहुतांश ठिकाणी रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली होती. या पावसाचा फटका महामार्गावरील विजेच्या खांबानाही बसला असून खांबावरील असलेले पथदिवे निखळले आहेत.

पुणे-मुंबई महामार्गावर रोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. हे निखळलेले पथदिवे वाहनावर पडून मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास प्रशासनाला जाग येणार आहे का? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT