उंडवडी, पुढारी वृत्तसेवा : शिर्सुफळ ते आटोळेवस्तीकडे जाणार्या रस्त्यावर पुलाचे काम सुरू आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून ते रखडले असून, ते पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
लोकांना जाण्या-येण्यासाठी पर्यायी मार्ग काढला आहे, पण तो निकृष्ट दर्जाचा असून सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावर चिखल झाला आहे. त्यामुळे नागरिकांना चिखलातून रस्ता काढावा लागत आहे. पुलाच्या अलीकडे दूध संकलन केंद्र आहे. त्यामुळे दूध टाकण्यासाठी जाता येता शेतकर्यांची मोठी गैरसोय होत आहे. पुलाच्या पलीकडे स्मशानभूमी आहे. त्यामुळे अंत्ययात्रेसाठी जाता येत नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
आटोळे-वस्तीकडे जाणार्या रस्त्यावर दोन महिन्यांपासून पुलाचे काम सुरू आहे. हे काम संथ गतीने सुरू आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून, या पुलाचे काम लवकरात लवकर काम पूर्ण करावे.
– गणपत आटोळे, ग्रामस्थ
कामाबाबतचा माहिती फलक संबंधित ठेकेदाराने लावलेला नाही. तसेच पर्यायी रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे.
– अॅड. राजकिरण शिंदे