पुणे

पवनानगर : पाणीसाठा कमी झाल्याने ठाकूरसाई गावातील मंदिराचे दर्शन

अमृता चौगुले

पवनानगर : पवना धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पाण्याखाली असणार्‍या ठाकूरसाई गावातील मंदिराचे अवशेष आता सहजपणे दिसू लागले आहेत. परिसरातील अनेक नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. पवना धरणासाठी 57 वर्षांपूर्वी जमीन संपादन झाल्यावर नागरिकांना गाव सोडावे लागले.

आता पाणीसाठा कमी झाल्यामुळे गावातील मंदिराचे अवशेष दिसून लागले आहेत. गावकर्‍यांनी पाण्याखाली गेलेल्या ठाकूरसाई गावाच्या अवशेषाची पाहणी केली. ठाकुरसाई ग्रामस्थांचे जुन्या आठवणींनी डोळे पाणावले. आपल्या मुलाबाळांसह हे सर्व जण जुन्या आठवणीत रमलेले दिसून आले. धरणासाठी जमीन संपादित केलेल्या सुमारे 863 जणांचे अजून पुनर्वसन झाले नाही. 55 ते 60 घरे तसेच, मंदिर, शाळा, धरणात गेले. तसेच, मंदिरातील मूर्ती स्पष्ट
दिसत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT