पुणे

धरण 100 टक्के भरल्याने नाझरे धरणाचे जलपूजन

अमृता चौगुले

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा :  नाझरे (मल्हारसागर) जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले. जेजुरी शहरासह पारगाव – माळशिरससह सुमारे 50 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. धरण 100 टक्के भरल्याने विविध गावातील कार्यकर्त्यांनी जलपूजन करून भंडाराची उधळण केली.

बुधवारी (दि. 17) सकाळच्या सुमारास मल्हारसागर व कर्‍हा नदीचे भंडारा उधळून व साडी -चोळी अर्पण करीत पूजन करण्यात आले. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, नाझरे कडेपठार सरपंच मनीषा नाझीरकर, कोळविहिरे सरपंच महेश खैरे, सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक महेश राणे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संदीप चिकणे, नाझरे शाखा प्रकल्प अभियंता अनिल घोडके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात प्रवाह सुरू असून 146 क्युसेकने विसर्ग होत असल्याची माहिती शाखा अभियंता अनिल घोडके यांनी दिली.

SCROLL FOR NEXT