पुणे ; पुढारी वृत्तसेवा : मआपलं नाणं खणखणीत असेल, तर कोणत्याही दडपशाहीला घाबरण्याचे कारण नाही,फ असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ममहाराष्ट्र कनेक्टफ कार्यक्रमात काढले.
पुण्यात शनिवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये शरद पवार आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी घेतली. या वेळी पवार यांनी ईडीच्या कारवाया, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक, सध्याचे राजकारण, यावर सडेतोड उत्तरे दिली.
हनुमान चालिसा प्रकरणात खासदार बृजभूषण यांना मॅनेज केले, या प्रश्नावर पवार म्हणाले, त्यांना कोणी मॅनेज करेल, अशी ती व्यक्ती नाही. कुस्तीच्या क्षेत्रात आम्ही एकत्र काम करतो. त्यामुळे हा विषय डोक्यातून काढून टाका. सोशल मीडियाविषयी पवार म्हणाले, काही गोष्टी गांभीर्याने मांडायच्या असतात. त्यासाठी स्पष्टता असावी लागते. ती सोशल मीडियात नाही.या वयातही इतका प्रवास कसा करता, या प्रश्?नावर स्मित हास्य करीत ते म्हणाले, लोकांमध्ये गेले की ऊर्जा मिळते, त्यात प्रवासाचा थकवा निघून जातो.
ईडीमुळे कितपत त्रास होतोय, या प्रश्?नावर पवार म्हणाले, मईडीच्या कारवाया गंभीरच आहेत. मला ज्या वेळी नोटीस आली तेव्हा म्हटलं मी एकदा जाऊनच येतो, मग ईडीचे अधिकारी हात जोडत आले. त्यासाठी आपलं नाण खणखणीत असावं लागतं.
ज्या तरुण पवारांच्या प्रेमात पडलो, तेच आजही आहेत
या वेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचीही मुलाखत सडेतोड झाली. ते म्हणाले, मआम्ही तरुण असताना ज्या शरद पवारांच्या प्रेमात पडलो होतो, त्यांच्यात कोणताही बदल नाही, ते तेच आहेत. भाजपविषयी ते म्हणाले, आम्ही भाजपला फसवून सत्तेत आलो नाही, त्यांच्या वृत्तीचा मी अभ्यास केला. त्यांनी शब्द पाळला नाही.