धायरी; पुढारी वृत्तसेवा : मुंबई, बंगऴूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. हा अपघात ट्रक, चार रिक्षा, तीन कार, एक बोलेरो जीप अशा आठ वाहनांचा झाला. या झालेल्या अपघातात सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत.
ही घटना शनिवारी दहा जुलै रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास वडगाव बुद्रुक हायवे उड्डाण पुलाजवळील विश्वास हॉटेल समोर घडली.
या अपघातात सर्व वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या अपघातामुळे परिसरात मोठा थरार निर्माण झाला होता.
दरम्यान नवले ब्रिजवर माल वाहतूक करणाऱ्या ट्रकचा ताबा सुटल्याने आज सकाळी अपघात झाला. यामध्ये 8 वाहनांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच काही जण जखमी देखील झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनासथळी दाखल झाले आहेत. दरम्यान मागील काही दिवसापासून या मार्गावरील अपघाताची मालिका सुरूच आहे.