उद्धव आणि राज एकत्र येतील, असे वाटत नाही: आठवले  file photo
पुणे

उद्धव आणि राज एकत्र येतील, असे वाटत नाही: रामदास आठवले

राज ठाकरेंच्या मोठ्या सभा होऊन देखील त्यांचा एकही माणूस निवडून येत नाही

पुढारी वृत्तसेवा

इंदापूर: राज ठाकरेंच्या मोठ्या सभा होऊन देखील त्यांचा एकही माणूस निवडून येत नाही. लोकसभेला त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता, त्याचा फारसा फायदा झाल्याचा दिसत नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तरी महायुतीवर परिणाम होणार नाही.

ते एकत्र आले, तरीही राज्यात दोघांची ताकद नगण्य आहे. ते दोघे एकत्र येतील, असे मला वाटत नाही, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. सोमवारी (दि. 24) इंदापुरातील शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते.

आठवले म्हणाले की, इंदापूर पोलिस खोटे गुन्हे दाखल करत असल्याचे सांगितले जाते. अशा घटना घडत असतील, तर मी पोलिस अधीक्षकांशी चर्चा करेन. रिपाइं कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की, आपण चुकीच्या गोष्टी करू नये.

चांगले काम करणार्‍या कार्यकर्त्यांना पोलिसांचे पाठबळ असायला हवे. ‘लव्ह जिहाद’चा कायदा असा आहे की, अनेक वेळा मुले-मुली एकत्र येतात, त्यांना त्यांची जात माहीत नसते. तरी देखील एकत्र येऊन संसार थाटावा, अशी त्यांची इच्छा असते. धर्म-जात बाजूला ठेवून दोघे एकत्र येतात. प्रत्येक प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ म्हणू नये, असे आठवले म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT