शिवाजी शिंदे
पूर्वीच्या काळी बहुसंख्य नागरिक पत्रांचा वापर संवाद साधण्यासाठी करत असत. एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी संदेश पाठविण्यासाठी पत्रांचा खूप उपयोग झाला आणि या देवाणघेवाणीत टपाल खात्याचा सर्वांत मोठा वाटा होता.
महाराष्ट्र टपाल विभागाचे अनेक प्रादेशिक विभाग आहेत. त्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे काम करत असलेला पुणे प्रादेशिक विभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. टपालच्या पुणे प्रादेशिक विभागाच्या अंतर्गत पुण्यासह सातारा, सोलापूर आणि नगर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागात एकूण 9 डिव्हिजन असून, लहान-मोठी अशी एकूण सुमारे 22 हजार 686 टपाल कार्यालये कार्यरत आहेत. गेल्या काही वर्षांत पुणे प्रादेशिक विभागाने त्यांच्या विविध योजनांमध्ये गुंतवणुकीमध्ये चांगलीच भरारी घेतली आहे. विविध योजनांची सुमारे 74 लाख 38 हजार 150 खाती आहेत. त्याच्या माध्यमातून कोट्यवधी रूुपयांची गुंतवणूक झाल्याचे दिसून आले आहे. पोस्ट लाइफ इन्शुरन्स पॉलिसीचा सर्वांत मोठा वाटा असून, मागील काही वर्षांत पॉलिसीच्या माध्यमातून 70 हजार 225 कोटी पॉलिसी काढण्यात आल्या असून, त्या माध्यमातून 2 हजार 837 कोटी रुपयांचा व्यवसाय झालेला आहे. तर ग्रामीण टपाल विभागामध्ये 54 हजार 142 पॉलिसी काढण्यात आल्या, त्या माध्यमातून 892 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे.
जागतिक टपाल दिनाच्या माध्यमातून लोकांना रोजगाराच्या संधी मिळतात. हा दिवस प्रामुख्याने टपालसेवांच्या भूमिकेबद्दल लोकांमध्ये जागरूकता पसरविण्यासाठी साजरा केला जातो. देशाच्या विकाससेवेचे आर्थिक आणि सामाजिक महत्त्व वाढविणे, हे जागतिक पोस्ट दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.