पुणे: पुणे जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी आता प्रशासनाला कामाला लावले आहे. हिंजवडी आयटी पार्क, माण-मारुंजी परिसरातील वाहतूक कोंडी, भूसंपादनाचा तिढा, मेट्रो आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर गुरुवारी तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.
या बैठकीला पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच मेट्रो व उद्योग-वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, चाकणच्या सर्वांगीण विकासासाठीही सुनेत्रा पवार यांनी संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. रस्ते, वाहतूक, पार्किंग, कचरा व्यवस्थापन, सुरक्षा आणि अतिक्रमणांसारख्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चाकण एमआयडीसीतील कंपन्यांच्या स्थलांतराच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा विषय अधिक गंभीर बनला आहे.