पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 31 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या पाचवी, आठवी शिष्यवृती तसेच शासकीय, आदिवासी, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पाचवीचे 23.90 टक्के, तर आठवीचे 12.54 टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
निकाल www.mscepune.in व https://mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल आपल्या लॉगिनमधून तसेच पालकांना त्यांच्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर बघता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घेण्यासाठी तसेच विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी किंवा ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये 17 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
गुणपडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरिता 50 रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाइन पेमेंटद्वारे भरावी लागेल. यासाठी केवळ ऑनलाइन अर्जच करावेत. दिलेल्या मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाइन प्राप्त अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या सहायक आयुक्त स्मिता गौड यांनी दिली आहे.
पाचवी शिष्यवृत्ती
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी : 4 लाख 18 हजार 55
परीक्षेसाठी उपस्थित विद्यार्थी : 3 लाख 82 हजार 697
परीक्षेसाठी अनुपस्थित विद्यार्थी : 35 हजार 358
शिष्यवृत्तीसाठी अपात्र विद्यार्थी : 2 लाख 91 हजार 227
शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी : 91 हजार 470
शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची टक्केवारी : 23.90
आठवी शिष्यवृत्ती
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी : 3 लाख 3 हजार 809
परीक्षेसाठी उपस्थित विद्यार्थी : 2 लाख 79 हजार 466
परीक्षेसाठी अनुपस्थित विद्यार्थी – 24 हजार 353
शिष्यवृत्तीसाठी अपात्र विद्यार्थी – 2 लाख 44 हजार 432
शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी – 35 हजार 34
शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची टक्केवारी –