पारगाव; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सोमवार (दि. 26) पासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. दिवसभर रिमझिम पाऊस पडला. सध्या बटाटा पीक फुलोर्यात आले असताना पुन्हा पावसाला सुरुवात झाल्याने बटाटा पिकामध्ये पावसाचे पाणी साचून हे पीक धोक्यात आले आहे . तालुक्याच्या पूर्व भागात पारगाव, शिंगवे, रांजणी, वळती, नागापूर, थोरांदळे परिसरात सोमवारी (दि. 26) सकाळी पावसाला सुरुवात झाली. दिवसभर रिमझिम पाऊस पडला. सध्या परिसरातील बटाटा पीक फुलोर्यात आले आहे. जमिनीत बटाटे तयार होऊ लागले आहेत.
परंतु, आता पुन्हा पाऊस सुरू झाल्याने पावसाचे पाणी जमिनीत साचून राहिल्याने जमिनीतील बटाटे सडण्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. यंदा बटाटा पिकाला सुरुवातीपासूनच अतिपावसाचा फटका बसला. शेतकर्यांनी बटाटा पिकासाठी मोठे भांडवल गुंतविले आहे. परंतु, सततच्या पावसामुळे शेतकरीवर्गात नाराजीचे वातावरण दिसत आहे.