नानगाव (पुणे) : दौंड तालुक्यातील पारगाव येथील पुलाचा भराव खचल्याने शिरूर-सातारा मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. पुल गुरुवारी रात्रीपासूनच वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पारगाव बाजूच्या पुलाच्या कडेला असलेला मातीचा भराव खचल्यामुळे तसेच पाण्याच्या वेगाने माती हळूहळू वाहत असल्याने खबरदारीचे उपाय म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. (Pune Flood Update)