शेळगाव : सराफवाडी (ता.इंदापूर) येथील सुमन तुकाराम जाधव (वय ६३ वर्ष) व अतुल तुकाराम जाधव वय (३५ वर्षे) या मायलेकरांनी सोमवार (दि. २०) रोजी शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले. हे टोकाचे पाऊल उचलण्यामागे कोणते कारण आहे, हे समजले नाही. घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला.
याबाबत तुकाराम दामू जाधव (वय ७७,व्यवसाय शेती)यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुकाराम जाधव यांची पत्नी सुमन जाधव व मुलगा अतुल जाधव यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी २० एप्रिल रोजी सकाळी सहा वाजण्यापूर्वी शेत जमीन गट नंबर 57/3मधील शेततळ्याजवळील लिंबाच्या व आंब्याच्या झाडाला फास लावून घेतला. त्यांना पुढील कार्यवाहीसाठी लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात खासगी वाहनाने आणले होते.माय लेकाच्या आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.माय लेकाच्या आत्महत्याने सराफवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कीर्तीलाल गायकवाड करत आहेत.