नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : नारायणगाव ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सहा वार्डमध्ये शांततेमध्ये मतदानाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं. कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोक बंदोबस्त ठेवलेला आहे. वार्ड क्रमांक पाच मध्ये रात्री उशिरा एका उमेदवाराबरोबर बाचाबाची झाल्याची माहिती समोर येत आहे तथापी हा वाद त्यांच्या त्यांच्यात चर्चा करून मिटला असल्याची माहिती मिळत आहे.
वार्ड क्रमांक सहा मध्ये शांततेमध्ये मतदान सुरू आहे. तथापी या वार्डात किरकोळ वाद झाला होता परंतु तो पोलिसांनी मिटवला आहे. एकंदरीत नारायणगाव या ठिकाणी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सगळीकडेच शांततेमध्ये मतदान होताना दिसत आहे.नारायणगाव ग्रामपंचायत मध्ये एकूण 16849 मतदार आहेत यामध्ये महिला मतदार 3385 तर पुरुष मतदार 8464 इतके आहेत. सगळ्यांनी निर्भयपणे मतदानाला बाहेर पडा आणि कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार होणार नाही शांततेमध्ये मतदान करा कायदा सुव्यवस्था पाळा अशा प्रकारचे आवाहन नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी केले आहे.