पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षण विभागाने राज्यातील शाळांची पर्यवेक्षकीय यंत्रणा मजबूत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार केंद्रप्रमुखांनी त्यांच्या अखत्यारितील शाळांना अचानक भेट देणे, विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन विद्यार्थ्यांचे आकलन तपासणे, शिक्षकांना अधिकच्या प्रशिक्षणाची आवश्यकता असल्यास त्याबाबतची शिफारस शिक्षणाधिकार्यांना करणे अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय पातळीवरील असर सर्वेक्षणात राज्यातील नांदेड जिल्ह्याचा समावेश होता. गुणवत्तेसाठी प्रयत्न करत असतानाही अनपेक्षित परिणाम समोर येणे चिंताजनक असल्याचे शासनाने काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.
असे आहेत आदेश
- केंद्रप्रमुखांनी त्यांच्या अखत्यारितील शाळांना अचानक भेट द्याव्यात.
- विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन विद्यार्थ्यांचे आकलन तपासावे.
- शिक्षकांना अधिकच्या प्रशिक्षणाची शिफारस शिक्षणाधिकार्यांना करावी.
- संबंधित शिक्षकाला प्रशिक्षणासाठी पाठवावे.
- विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झाली नसल्यास त्याबाबतचा अहवाल पाठवावा.
- केंद्रप्रमुखाच्या पर्यवेक्षकीय कामकाजाचा दर महिन्याला अहवाल घेणे आवश्यक.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.