दिवे; पुढारी वृत्तसेवा: दिवे, सोनोरी, वनपुरी आदी परिसरात यावर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. सोयाबीनला भांडवली खर्च कमी येतो आणि पाऊस कमी-जास्त झाला तरी सोयाबीनचे हमखास उत्पादन मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे कल वाढला आहे.
सोयाबीनचे पीक विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु यावर्षी पावसाने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे दिवे परिसरातील शेतकर्यांना जास्तीचा बाजारभाव मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या परिसरातील पीक फुलोर्यात असून जोमदार आले आहे.