पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात कमाल तापमान वाढणार असले, तरीही बंगालच्या उपसागरातून येणार्या बाष्पयुक्त वार्यांमुळे आगामी चार दिवसांत धुळे, नगर, नाशिक येथे गारपीट, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. सध्या राज्यात कमी दाबाचा पट्टा कायम आहे. तसेच बंगालच्या उपसागराकडून बाष्पयुक्त वारे वाहत राज्यात येत आहेत, त्यामुळे दिवसभर कडक ऊन तर सायंकाळी सोसाट्याच्या वार्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
12 ते 15 एप्रिलदरम्यान प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत पावसाचा अंदाज आहे. त्यातही धुळे, नाशिक व नगर येथे गारपिटीसह पावसाचा अंदाज आहे, तर उर्वरित भागात सोसाट्याच्या वार्यासह हलका ते मध्यम पाऊस होईल.