ओतूर आणि परिसरात बुधवारी दुपारी १ वाजेपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोंढे रस्त्यांवरून वहात असल्यामुळे रस्त्यांना ओढ्याच्या पुराचे स्वरूप आले होते. या परतीच्या पावसाने ओतूर आणि परिसराला अक्षरशः झोडपून काढले. या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाला मोठा धोका तयार होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेली महिनाभर पावसाने विश्रांती घेतली होती.मोठ्या प्रतीक्षेनंतर पावसाने लावलेल्या हजेरीमुळे जोरदार झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले. त्याशिवाय ओतूर गावठाणातील सर्व रस्ते जलमय होऊन वहात होते. परिणामी व्यापारी बाजार पेठेतील सर्व व्यवहार ठप्प झाल्याचे निदर्शनास आले.
ओतूर,रोहकडी, आंबेगव्हान, फापाळे शिवार, डोमेवाडी,पानसरे वाडी,धोलवड, ठीकेकरवाडी, उदापूर, खामुंडी,मांदारणे, डींगोरे आदी परिसरात देखील मुसळधार पाऊस बरसल्याचे वृत्त हाती आले आहे.परतीचा पाऊस नुकसानिकारक ठरत असल्याचे बोलले जात आहे.