पुणे

आळंदी : सप्तमीला समाधीवर पाणी घालत भाविकांकडून माऊलींचा थकवा दूर

अमृता चौगुले

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : पीठसाखर, लिंबु आणि गरम पाण्याची धार घालत माऊलींचा कार्तिकी वारीतील शिनवटा घालवण्यासाठी भाविकांनी माऊलीं मंदिरात गर्दी केली होती. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला परंपरेनुसार संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर सकाळी भाविकांच्या प्रशाळपूजा संपन्न झाल्या. त्यानंतर देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचे हस्ते पवमान अभिषेकपूजा करण्यात आली, तद्नंतर मानकऱ्यांना देवस्थानचे वतीने नारळ प्रसाद वाटप करण्यात आले.

संत. ज्ञानेश्वर महाराजांचा यंदा संजीवन समाधी सोहळा झाला. हा सोहळा अमवास्येपर्यंत चालत असतो. त्यांनंतर सात दिवसांनी प्रशाळ पूजा पार पडत असते. यावेळी भाविक समाधीवर पाणी घालत माऊलींचा एक प्रकारे थकवा घालवत असतात. यासाठी आवर्जून भाविक आळंदीत येत असतात. कार्तिकीत भाविकांना माऊलींच्या मुखदर्शनावर समाधान मानावे लागले होते. प्रशाळ पूजेनिमित्त त्यांचे स्पर्शदर्शन झाल्याने एक प्रकारचे समाधान भाविकांच्या नजरेत यावेळी दिसून येत होते.

SCROLL FOR NEXT