पुणे : पुढारी वृत्तसेवा : रेल्वेतून प्रवास करताना विनाकारण रेल्वेची संकटकालीन साखळी ओढणार्या 793 जणांवर रेल्वे प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. तसेच त्यांच्याकडून 2 लाख 72 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सतत चैन पुलिंग होत असल्यामुळे 197 मेल/एक्स्प्रेस गाड्यांना उशीर झाला आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या काळात रेल्वे प्रशासनाने चैन पुलिंगचे हे गुन्हे नोंदवले आहेत.
अनावश्यक कारणांसाठी संकटकालीन साखळीचा अवलंब करू नका, हा रेल्वे कायद्याच्या कलम 141 नुसार दंडनीय अपराध आहे. यासाठी एक वर्षापर्यंत कारावास आणि दंड किंवा दोन्ही ठोठावले जातील, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.