पुणे: अदानीची तिजोरी भरण्याच्या नादात फडणवीस सरकारने सामान्य पुणेकरांवर स्मार्ट मीटरची सक्ती सुरू केली आहे. हे स्मार्ट मीटर सर्वसामान्य नागरिकांची लूट करणारे आहे. स्मार्ट सिटी बनविण्याचे वचन देऊन सत्तेत आलेले फडणवीस पुणे शहराला उद्ध्वस्त करून नागरिकांच्या माथी स्मार्ट मीटर मारत आहेत.
अदानीचा फायदा करण्यासाठी लाखो पुणेकर नागरिकांना फडणीस सरकार लुबाडत आहे. तसेच, महावितरणच्या जागेत अदानी कंपनीला कार्यालयासाठी जागा देऊन फडणवीस सरकारने अदानीसमोर थेट लोटांगण घातले आहे.
फडणवीस सरकारच्या या मनमानीविरोधात आक्रोश व्यक्त करण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे (पूर्व) शहराध्यक्ष प्रशांत जगताप व पुणे (पश्चिम) शहराध्यक्षा दीप्ती चवधरी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. रास्ता पेठमधील महावितरण कार्यालयाबाहेर असंख्य नागरिकांनी फडणवीस सरकारच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला.
तसेच, काँग्रेसच्या वतीने महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना स्मार्ट मीटरसंबंधित, महावितरणच्या कार्यालय आवारातील अदानीचे कार्यालय हटविण्यासाठी निवेदन देण्यात आले. या वेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी यांच्यासमवेत नगरसेविका अश्विनी लांडगे, सायरा शेख, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे,
संगीता पवार, यशराज पारखी, भाऊसाहेब आजबे, द. स. पोळेकर, रमेश सोनकांबळे, सुरेश कांबळे, अविनाश अडसूळ, मजहर मणियार, सुनील पंडित, संजय कवडे, दीपक ओव्हाळ, चेतन अगरवाल, सतीश पवार, अकबर शेख, वाल्मीक जगताप, दादाश्री कामठे, भगवान कडू, संतोष सुपेकर, अमित कांबळे, माऊली मोरे, पप्पू घोलप, आसिफ शेख, जुबेरबाबू शेख, आयुब पठाण, परवीन तांबोळी, जिनाद सय्यद आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.